जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी भेटण्याची शक्यता असून अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. महायुतीचे सर्वात कमी वयाचे उमेदवार असणारे अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महायुतीची अधिकृत उमेदवारी आसताना देखील त्यांनी समजदारीची भूमिका घेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सठी फॉर्म मागे घेतला व प्रामाणिकपणे महायुती धर्म पाळला व महायुतीचा प्रचार केला. निवडणूक प्रचारादरम्यान कुणावर टीका टिपण्णी न करता व्हिजन व विकासावर बोलनारा नेता म्हणून त्यांनी ओळख मिळवली. ओबीसी समाज, अल्पसंख्यांक समाज शेख यांच्या पाठीशी उभा राहिला तसेच तालुक्यात लाडकी बहिण योजना, अजितदादा आरोग्य योजना, बचत गटाचे सक्षमीकरण अतिशय अचूक पद्धतीने केल्याने अब्दुल शेख यांचा महायुतीला चांगलाच फायदा झाल्याचे निवडणूक निकालात दिसून आले. त्यामुळे शेख यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शेख यांना संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अब्दुल भैय्या शेख यांची विधानसभा निवडणुकीत महत्वाची भुमिका बजावलेली असुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यंमंत्री अजित पवार यांच्या जवळचे विश्वासू असणारे शेख यांची विधानपरिषद सदस्य किंवा महामंडळासाठी वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे. यामुळे नेवासा राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे उत्साह निर्माण झाला असून शेख यांच्या नेतृत्वात कमी वेळेत राष्ट्रवादीने आपली ताकद निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांचा शेख यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होत आहे. शेख यांना मुंबई येथे बोलाऊन घेतल्याचे समजत आहे. सर्व समावेशक चेहरा असनारे शेख यांचे महिलांसाठी मोठे कार्य आहे. त्यांच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. आता अब्दुल शेख हे राज्याचे राजकारणात जातात की जिल्हा परिषद निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून समोर येतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
अब्दुल भैय्या शेख यांचा महायुतीसाठी मोठा त्याग असून त्यांनी सर्व समाजाला घेऊन वाटचाल केली आहे.त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अतिशय चांगले काम करत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुक्यात चांगले यश संपादित करेन. अशा युवा नेत्याला पक्षाने संधी दिली तर पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, अशी भावना तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेवासा विधानसभा अशोक मोरे यांनी व्यक्त केली आहे. सर्वांना हवेहवेसे वाटणारे भैय्या आम्हा युवकांना कुटुंबातील सहकारी असल्यासारखी वागणूक देतात. सर्वांच्या अडीअडचणीमधे उभे राहतात. म्हणून आम्हाला ते नेता नाही तर मित्र वाटतात, अशा सर्वसाधारण व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिराज आरगडे पाटील, नेवासा विधानसभा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांनी दिली आहे.